रत्नागिरीः-
शहरातील राजवाडा येथे पाणी भरण्यावरून दोन गटात हाणामारी झाली. यात दोन महिला जखमी झाल्या असून शहर पोलीस स्थानकात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यानुसार 19 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तस्मिया रियाज होडेकर (24, जामा मशीद, राजीवाडा, रत्नागिरी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची काकी फातिमा होडेकर घरासमोर पाणी भरत असताना जैबून इकबाल होडेकर हिने पाणी भरायचे नाही असे सांगितले. यावरून दोघींच्यात वाद सुरू झाला.
यावेळी तेथे फैय्याज होडेकर, नाझीया गडकरी, सैजादि सोलकर, नुसेबा गडकरी, मैरून होडेकर, रेश्मा होडेकर, शायदा होडेकर, नासिर होडेकर, वहाब होडेकर, सईदा होडेकर, तन्वीर सोलकर, अश्रफ होडेकर, आस्मा होडेकर अशा 13 जणांनी फातिमा इम्रान होडेकर यांना व त्यांच्या 2 मुलांना अरफा होडेकर, हर्षद होडेकर याना शिवीगाळ करत हातातील रॉडने मारहाण केली. यात तस्मिया होडेकर (24), सौबान होडेकर हे दोघे जखमी झाले. त्यानंतर तस्मिया यांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.
तर दुसऱ्या बाजूने नाझीया सिराज गडकरी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्या स्वतः व त्यांची आई जैबुनिसा इकबाल होडेकर या सकाळी 11.30 वा. बाजारातुन घरी जात असताना इम्रान होडेकर, फातिमा होडेकर, अरशद होडेकर, शबाना होडेकर, सौबान होडेकर, तस्मिया होडेकर या 6 जणांनी शिवीगाळ करून नाझीया यांचे डोके भिंतीवर आपटले. यात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. या झटापटीत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व आईच्या गळ्यातील चेन तुटून नुकसान झाले. याप्रकरणी नाझीया यांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली त्यानुसार पोलिसानी 6 जणांविरोधात भादवी 324, 143, 147, 504, 506, 427नुसार गुन्हा दाखल केला आहे.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा